गरज आहे पुन्हा मुळांकडे वळण्याची……
आजच्या धावपळीच्या जीवनात आपलं सगळं काम झटपट आणि सोपं व्हावं यासाठी आपण टेक्नॉलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहोत. पण हे करत असताना, आपण नकळत आपल्या शरीराला, मनाला आणि सर्वात महत्त्वाचं – आपल्या “विचारशक्तीला” दूर लोटत आहोत.
AI आणि ऑफिस वर्क कल्चरचा बदललेला चेहरा
AI आल्यानंतर बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत, यात शंका नाही. पण हे सोपं करताना, आपण विचार करणंच कमी केलंय.
- पूर्वी एखादं सर्जनशील काम करताना डोकं लावावं लागायचं, आता मात्र AI कडून उत्तर मिळतं आणि आपण ते तसंच स्वीकारतो.
- विचारांची जागा ‘प्रॉम्प्ट्स’ नी घेतली आहे आणि सर्जनशीलतेची जागा ‘रेडीमेड सोल्यूशन्स’ नी!
- काहीतरी नवीन करून दाखवायची घाई असते – पण विचार न करता केलेलं ‘नवं’ अनेकदा चुकीचं ठरतं.
यामुळे, आपण आपला विचार करण्याचा स्वभाव हरवत चाललो आहोत. जे विचार, निरीक्षण आणि प्रयोग करून तयार व्हायचं – ते आता कॉपी-पेस्ट पद्धतीने होतंय. आणि याचंच फार मोठं नुकसान आपल्या कामाच्या दर्जावर आणि मानसिक क्षमतेवर होतंय.
पुन्हा मुळांकडे वळायचं का?
हो, कारण तिथे स्वतःचं विचारमंथन, अनुभव आणि आत्मविश्वास आहे.
पूर्वी घरात कपडे धुणं, झाडू मारणं, स्वयंपाक करणं – या गोष्टी ‘काम’ होत्या, पण त्यातून आरोग्य, कळकळ आणि शिस्त मिळत असे.
आज ऑफिसमध्येसुद्धा, प्रत्येक गोष्टीत तंत्रज्ञानावर अवलंबून राहून, आपण मन:पूर्वक विचार करणं सोडून दिलंय.
माझं मत:
टेक्नॉलॉजी वापरा, पण त्याचं गुलाम बनू नका.
AI वापरा, पण आपली “माणूस म्हणून विचार करण्याची ताकद” जपून ठेवा.
नवीन काही करायचं म्हणून न विचारता जे काही करतोय – ते आपल्याला मुळांपासून दूर नेतंय. त्यामुळे वेळ आहे थांबून विचार करण्याची – आणि गरज आहे पुन्हा मुळांकडे वळण्याची


